कृतज्ञता महत्वाची

*🌹"कृतज्ञता" आपुलकीच्या  माणसासाठी 🙏*

   *कोण कसं वागला  या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा  आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा.*  *आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा.  त्यांच्या चुका तिथेच सोडून द्या  आणि पुढच्या प्रवासाला सुरूवात करा.  या दुनियेत असा एकही मनुष्य नाही ज्याच्या जीवनात दुःख, अडचणी नाहीत. ज्याने सृष्टी निर्माण केली त्यालाही हे सर्व भोगावं लागलंय.  आपण तर साधारण मनुष्य आहोत. सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या पाहिजेत हा आग्रहच माणसाच्या सर्व दुःखाला कारणीभूत ठरतो.* 

*कोणाच्या वाईट वागण्याने आपलं काहीही वाईट होत नसतं.  मिळतं तेच जे आपण पेरलेलं असतं. आपल्याशी कोण कसही वागेना, आपण सगळ्यांशी चांगलंच वागायचं. इतकं चांगलं की विश्वासघात करणारा ही पुन्हा जवळ येण्यासाठी तळमळला पाहिजे. आयुष्याची खरी किंमत तेव्हाच कळते, जेव्हा स्वतःच्या जीवनात संघर्ष करण्याची वेळ येते.*

*आयुष्यात कितीही कठीण परिस्थिती आली तरी घाबरून जाऊ नका. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा आपण जिवंत आहोत  म्हणजे खूप काही शिल्लक आहे.  जी माणसं स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतात ती माणसं आयुष्यात कधीही अपयशी होत नाहीत.*

 *जगणं कोणाचंही सोपं नसतं. आपण सोडून बाकी सगळ्यांचं चांगलं आहे असं फक्त आपल्याला वाटत असतं, सर्वात सुखी माणूस तोच आहे जो आपली किंमत स्वतः ठरवतो  आणि  सर्वात दुःखी माणूस तोच आहे जो आपली तुलना इतरांशी करतो.*
      
*ज्या पात्रतेने तुम्हाला नोकरी दिली, तीच पात्रता एखाद्या व्यक्तीकडे आहे  त्याला अजूनही नोकरी नाही. ज्या प्रार्थनेचे उत्तर देवाने तुमच्यासाठी दिले, तीच प्रार्थना इतर लोक करत आहेत,  पण यश मिळाले नाही.  तुम्ही रोज सुरक्षितपणे जो रस्ता वापरता, तोच रस्ता आहे  जिथे अनेकांनी आपले मौल्यवान जीव गमावले.*  

*ज्या मंदिरामध्ये देवाने तुम्हाला आशीर्वाद दिला, त्याच मंदिरामध्ये इतर लोकही पूजा करतात, तरीही त्यांचेजीवन विसंवादात आहे. तुम्ही हॉस्पिटलमध्‍ये वापरलेला बेड, तुम्‍ही बरे झालात  आणि  डिस्चार्ज मिळाला,  त्याच बेडवर इतर अनेकांनी अखेरचा श्वास घेतला.*  

*ज्या पावसाने तुमच्या शेतात चांगले पीक आले, त्याच पावसाने दुसऱ्याचे शेत उध्वस्त केले. कारण तुमच्याकडे जे काही आहे  ती फक्त "ईश्वरी कृपा" आहे.  तुमच्याकडे असलेल्या सर्व गोष्टींचा तो दाता आहे.  म्हणुनच तुमच्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञ रहा.*

*पश्चात्ताप भूतकाळ बदलू शकत नाही आणि काळजी भविष्याला आकार देऊ शकत नाही.  म्हणूनच वर्तमानाचा आनंद घेणे हेच जीवनाचे खरे सुख आहे.* 

 *दुसऱ्यांबद्दल वाईट बोलुन त्यांचे दुर्गुण सांगून, आपला चांगुलपणा  आणि  कर्तृत्व कधीच सिद्ध होत नसते.*
      
*वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नये. कारण, ज्या गोष्टी मोजल्या जातात, त्या नक्कीच संपतात. कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर एक बहुमूल्य संपत्ती विकसित होते, ज्याच नाव आहे, आत्मविश्वास. जगणं हे आईच्या स्वाभिमानासाठी असावं आणि जिंकणं वडिलांच्या कर्तव्यापोटी असावं.*
     
*समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगले वागा,  ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे,  तर तुम्ही चांगले आहात म्हणून...*

*जीवनात सुखाच्या व्याख्या खूप आहेत.  पण मिळालेल्या आनंदात समाधान मानणे हे आयुष्यातील खरे सुख आहे.*

*मनुष्य निवास बदलतो.  वस्त्र बदलतो,  नाती बदलतो,  तरीही तो दुःखीच राहतो.  कारण,  तो स्वतःला खूप विद्वान समजतो, व स्वतःतील अहंकार, इगो बदलत नाही.*_

*आनंद त्यांना नाही मिळत,  जे स्वत:च्या स्वार्थासाठी जगतात मात्र...  तो त्यांनाच मिळतो,  जे  दुसऱ्याच्या आनंदासाठी स्वत:च्या आयुष्याचे अर्थ बदलतात.*

 *मानवी निराशा  आणि  अविश्वास या भावना म्हणजे हळुवारपणे भिनत जाणारं जणू विषच..!  हे विष मनुष्याला निराशेच्या गर्तेत ढकलून त्याच्या सर्व शक्ती नष्ट करतात.  याउलट आशा  आणि  विश्वास या भावना असं अमृत आहे,  ज्याच्या एका थेंबाचा आस्वाद घेतल्याने देखील मनुष्य स्वतःमधील सर्वोच्च शक्यता विकसित करण्यासाठी  आणि  सुखमय जीवनाकडे अग्रेसर होतो...!!*

*दररोज परमेश्वराला प्रार्थना करा. आजपर्यँत जे दिले ते तुझेच आहे. मी निमित्त मात्र आहे. इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेस. आमचे राहिलेले आयुष्यही तुझ्या कृपाशिर्वादाने सुख, शांती, समाधान, आनंद व  समृध्दीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण आम्हास सतत होऊ देत. चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे. या शरीराला कोणताही घातपात होऊ नये. याचीही काळजी तुच घे.*

*आपल्या जिवलग व्यक्तींच्या आठवणी, आभास वास्तविकता स्वीकारून आनंदाने जगा. स्वतःची व कुटुंबाच्या जीवनाच्या आरोग्याची काळजी घ्या. सरकारी सुचनांचे, नियमांचे व कायद्याचे पालन करा, पण लोकशाही व संविधान सुरक्षित ठेवा. एकमेकांना अडचणीत आणु नका, त्यांना मदत करा, जमत नसेल तर निदान गप्प तरी बसा, नकोत्या उठाठेवी करू नका. समाजातील खोट्या, राजकारणी, मतलबी, स्वार्थी, गर्विष्ठ, अहंकारी, लबाड, लोकांपासुन सावध व दूर रहा, अफवानवर विश्वास ठेवण्या आधी प्रथम खात्री करा, नेहमी सुखी, समाधानी व आनंदी राहा. नेहमी सावध रहा, सुरक्षित रहा व सतर्क रहा.*

🙏🌹🙏🌹🙏🌺🙏🌹🙏🌹

Comments

Popular posts from this blog

Helping Verbs (साहाय्यकारी क्रियापदे) with Marathi Meaning

HSC Grammar Worksheet

Summary writing in Marathi